Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Friday, October 21, 2016

माझे बाबासाहेब बहुजनासाठी लढले

 माझे बाबासाहेब बहुजनासाठी लढले
---------------------------------------   संकल्प भिमटायगर रत्नदिप
   कोणी ताज साठी लढले
   कोणी राज साठी लढले
    स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब या
     बहुजनासाठी लढले

जे होते जवळ ते भिमाने पेरले
       नेत्याने ते फक्त
    आपलेच घर भरले
      वाघ असुन स्वता
       घरा मध्ये दडले
   स्वभिमान आहे मला
    माझे बाबा साहेब
  बहुजनासाठी लढले

जे पाईक होते भिमाचे टी.व्ही
        बीवी आन
     खोलीसाठी लढले
    सुंदर ही बाग भिमाची
  तिचे पानोना पान झडले
    स्वभिमान आहे मला
     माझे बाबासाहेब
   बहुजनासाठी लढले

निवडणुकिच्या रिगनात
 जरी बाबासाहेब पडले
  घटना लिहुनी भीमाने
    सारे रेकार्ड तोडले
   स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब या
    बहुजनांसाठी लढले

     लिंगच्या युध्दात
   कित्येक ध्येय पडले
 आई बहीनीना आमच्या
    कित्येकांनी छळले
हक्क आणि शांतसाठी
फक्त बाबासाहेब लढले
 स्वभिमान आहे मला
  माझे बाबासाहेब या
  बहुजनांसाठी लढले

  विश्वामध्ये झाले आहे
    एकचं गोष्ट सिध्द
आचार विचार ऋनितीने
बुध्दांचा धम्म आहे शुध्द
पाहीजे फक्त भगवान बुध्द
  स्वभिमान आहे मला
    माझे बाबासाहेब
   बहुजनांसाठी लढले

     !!  जय भिम  !!

करोडपती असलेले *महात्मा फुले*

 🌋
*कृपया वेळ काढून अवश्य वाचा*

संदर्भ- *""किशन सूर्यवंशी""*
 यांच्या *महात्मा फुले* यांचे खरे वारसदार कोण?
या पुस्तकातून

1 - करोडपती असलेले *महात्मा फुले*
हे 1890 साली मरण पावतात ;
तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण म्हणजे या *महात्मा फुले* यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्या मुळे समाजातील काही कर्मठ लोक अग्नी देवू देत नव्हते;

यशवंत मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत ;
हा खेळ बराच वेळा चालला;
*महात्मा फुले* यांचा पार्थिव पडून आहे ;
तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला शेवटी *सावित्रीबाई फुले* पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला

विचार करा जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचाटधारेच्या प्रभावाने विटंबना करतात. यावर *फुले* अनुयायी विचार करतील काय?

2 - दुसरी एक घटना अशी की *महात्मा फुले* यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती ;
अतिशय गरीब अवस्थेत खायला अन्न नाही राहायला घर नाही ;
अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही;

अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली;

तर मग तीचे प्रेत तसेच पडून आहे;
पण दफन करायला पुढे कोणीही आले नाही ;
दिवसभर ते प्रेत सडत आहे त्याचा वास येतोय; जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही;
शेवटी पुणे महानगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंसकार केला

विचार करा त्या काळात या फुल्यांच्या वडीलांचे मासिक उत्पन्न बारा लाख रुपये होते;

तर रतन टाटा यांच्या उत्पन्न फक्त वीस हजार रुपये होते म्हणजे *फुलेनकडे दोनशे एकर शेती होती* व काही प्रमाणात फुलझाडे लावत; संदर्भ (हरी नरके लिखित पुस्तक )

विचार करा आम्ही शिकून साहेब बनावे यासाठी *फुलेनी*
जीवनाची माती केली पण त्यांचा शेवट हा पशु प्रमाणे व्हावा ही बहुजनांना साठी शरमेची गोष्ट आहे;
जगाच्या पाठीवर फुले हालहाल होवून मेले मग आम्ही घरात त्यांचा फोटोदेखील लावत नसू तर हा किती कृतघ्नपणा करत आहोत याचा विचार केला पाहिजे;

एकदा *सावित्रीबाई फुले* आपल्या पतीला म्हणाल्या की आपण मेल्यावरही बहुजन समाजाचे कसे होईल? ही चळवळ पुढे कोण चालवणार? तेव्हा *फुले* उत्तर देताना
सांगितले की "" माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक *रक्ताच्या थेंबातून बहुजनाच्या घरात *महात्मा फुले* *जन्म घेतील* ""

विचार करा *फुलेनी* बहुजनावर किती विश्वास ठेवला
मग सांगा आतापर्यंत किती फुले जन्मले? एकही नाही

मग *महात्मा फुले* चुकीचे बोलले की त्यांचे अनुयायी चुकीचे वागले याचा आम्ही विचार केला पाहिजे

जर उदयोगपती असलेले हे *फुले*
यांनी  समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारस जीवंत राहिले असते व आजचे रतन टाटा ;बिर्ला; अंबानी; सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन या साऱ्या श्रीमंत लोकांना *महात्मा फुले* यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते एवढे गर्भश्रीमंत राहीले असते
पण *फुलेंनी* समाज हितासाठी स्व वडीलोपार्जित सम्पत्तिचा त्याग केला आज आम्ही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार देखील जोपासत नाही........

आणि यावर विचार ही करू नये

 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
🏵येड्या गबाळ्याने वाचू नये🏵
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

आणि यावर विचार ही करू नये

👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻
आपल्या देशातील लबाड माणसांचे प्रमाण अधिक आहे.. .


👶🏻ज्यांनी उत्तम *शेती* सांगितली त्यांनी कधीही शेती केली नाही.

👶🏻ज्यांनी *गाय* पवित्र आहे सांगितले त्यांनी कधीही गाय सांभाळली नाही की तीचे *शेण* काढले नाही.

👶🏻 ज्यांनी  *सत्यनारायण* सांगितला त्यांनी कधीही सत्यनारायण घातला नाही.

👶🏻ज्यांनी *अन्नदान* महादान सांगितले त्यांनी कधीही पुढ्यातला घास दुसर्‍याला भरवला नाही.

👶🏻ज्यांनी *शांती* सांगितली
त्यांनी कधीही शांती केली नाही.

👶🏻ज्यांनी *चारोधाम* सांगितले
त्यांनी कधीही चारोधाम केले नाहीत.

👶🏻ज्यांनी *फुले-सावित्रीमाई, डॉ. बाबासाहेब* यांच्या *महिला* शिक्षणाला विरोध केला
त्यांच्याच महिला सर्वात जास्त शिकल्या आहेत.

👶🏻ज्यांनी पोथ्यांमध्ये
*सिमोल्लंगन, परदेशगमनाला जाणे धर्मद्रोह किंवा पाप* आहे असे सांगितले आणि विरोध केला तेच सर्वात जास्त *एन आर आय* आहेत.

👶🏻 ज्यांनी सदा कनिष्ठ *नोकरी* म्हटले तेच सर्वात जास्त नोकरीत आहेत.

👶🏻 *मातृ-पितृ देवो भव* म्हणणाऱ्यांचेच *माता-पिता* अनाथ आश्रमात आहेत.

👶🏻 *एकादशी*ला अन्न खावू नका म्हणणारे चिवडा खावून टुम्म होतात.

👶🏻कधीही *मंदिर* न बांधणारे
कायम मंदिरात असतात आणि तिथे कायम *हक्क* गाजवित असतात.

👶🏻इतरांना *पारायण* सांगणारे
कधीही पारायण ऐकत नाहीत.

👶🏻 *परशुरामाला* माननारे
*श्रीरामाच्या* मंदिराचा वाद घालतात.

👶🏻शिवरायांची जन्मतारीख उपलब्ध असताना मुद्दामहुन शिवजयंतीचा तिथी आणि तारीख असा वाद पेटवितात व पावलोपावली शिवरायांचा अवमान करतात.

पण स्वतः मात्र आपल्या बापजाद्यांचे जन्मदिवस तारखेप्रमाणेच करतात.

👶🏻वारकऱ्यांना *दिंडीत* पायी पाठवणारे स्वतः *कार*ने प्रवास करतात.

👶🏻 *छत्रपतींना* राजा होण्यास विरोध करणारे यवनांचे पाय चाटतात.

👶🏻हिंदु राजा होण्यास *विरोध* करणारेच हिंदू राष्ट्राची मागणी करतात.

👶🏻धर्मांद पोपनी सॉक्रेटीस, कोपरनिकपस, गॅलीलिओ, येशू या विवेकवादी (विज्ञानवादी) महापुरुषांना सुळावर चढविल्याचे चूक आहे हे हळ-हळ व्यक्त करीत सांगतात.

स्वतः मात्र इथल्या विवेकवादचा चार्वाक, तुकोबा, रविदास, बसवेश्वर, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी करतात.

😳भारतातील लोक शिकले पण कधी बहुतांशी शहाणे झाले नाहीत
किंबहुना, शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनीच शाळेत देवपूजा व तत्सम गोष्टींना प्राधान्य देऊन चेष्टा मांडली.

आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे

 🌹"मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे..........."🌹

🌹 "मनोगत"🌹

                  -------मित्रांनो मला आज आपल्याशी थोडं बोलायचं आहे. आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे,,,,असे मी समाजात वावरतांना भरपूर लोकांच्या तोंडातून ऐकले......
खुपदा लोकांशी संवाद साधल्यानंतर त्यांची प्रतिउत्तरे ऐकून मला थोडा धक्काचं बसला,,,,
"समाजातील लोकांची प्रच्च्युत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.
1)आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे,,मग त्याला बाहेर काढून आपण स्वत:वर कशाला चिखल उडवायचा.....

2)आपल्या समाजातील व्यक्ति कधीचं सुधारणार नाही..........

3) धम्म काय आपल्याला दोन वेळचे जेवण आणून देतात का??????

4) मंगेश धम्माचा नाद सोडून दे,,,,तुला शेवट पर्यंत काहीचं मिळणार नाही.......

5) अरे आमच्या कुटूंबाला सोडून आम्ही जर धम्माचे कार्य केले
तर उद्या उघड्यावर आमचे कुटूंब येणार..........

6) धम्माचे कार्य फक्त बाबासाहेबचं करु शकतात. ते आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचे काम नाही.......

7) धम्माचे कार्य करतांना खूप पैसे लागतात,,,मग आम्हांला पैसे कोण देणार,,,,गावागावात जाऊन धम्माचे कार्य करण्याचा मुर्खपणा कोण करेल,,,

8) आम्ही बाबासाहेब नाही आणि आम्हांला बाबासाहेब सुद्धा बनायचे नाही........

9) पाटील देशमुख लोकांमध्ये आम्हांला किंमत आहे,,,,हे धम्माचे कार्य करुन आम्हांला आमची किंमत वाया घालवायची नाही........

10) या जगात धम्मापेक्षा  पैसा जास्त महत्वाचा आहे मंगेश,,,,,
"पैसा करे भल कैसा"

मित्रांनो गावागावात धम्माचा प्रचार आणि प्रसार करतांना समाजा सोबत धम्मा बद्दल चर्चा करतांना आपल्या बुद्धिजीवी समाजाने मला वरील उत्तरे दिली.
ही उत्तरे ऐकूण प्रत्येकाला आश्चर्यचं वाटेल. पण ही सर्व उत्तरे खरी असून माझ्या सोबत प्रत्यक्षात घडलेली आहे,,,
ही विचित्र उत्तरे ऐकून मला एका गोष्टीचा अनुभव आला की,,,,आपला समाज बाबासाहेबांवर आणि तथागतांवर केवळ भावनिक प्रेम करतोय,,,भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी बाबासाहेबांना आणि तथागतांना सिमेंटच्या पुतळ्यांमध्ये कैद करून ठेवले.
आणि समाजाने त्यांचे एक ब्रीद वाक्य तयार केले की
"अन्याय,,अत्याचार व गुलामगिरीत जिवन जगणे हाच आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारचं"
अन्याय अत्याचारात जिवन जगण्याची जणूकाही त्यांना सवयचं जडलेली आहे.

🌹"बुद्ध धम्मावरील प्रबोधन"🌹

              ----------अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणीक बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध,,,,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,,महामानव,,युगपुरुष,,युगप्रवर्तक,,,विश्वरत्न बोधिसत्व परमपुज्य डाँ.बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर,,,,,थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,,क्रांतीज्योती सावित्री बाई फुले,,माता रमाई,,धम्मप्रवर्तक सम्राट अशोक,,संत कबीर,,,आरक्षणाचे जनक छत्रपति शाहू महाराज ,,स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज या महान विभूतींना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या भाषणास प्रारंभ करतो.

जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जीवंत होते,,तोपर्यंत या समाजाला एक वैचारिक दिशा होती,,,,परंतू बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्या नंतर हा संपूर्ण समाज विविध गटातटामध्ये विभागला गेला...
समाजाच्या संकुचित विचारसरणीला गती मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली....

लहानपणापासून जातीभेदाचे चटके अनुभवत असतांना बाबासाहेब आपल्या आईला विचारतात,,,आई हा संपूर्ण समाज माझे शोषण करते आहे,,माझा तिरस्कार आणि अपमान करत आहे,,,माणूसकी नावाची बाब नेस्तनाभूत झालेल्या लोकांसाठी मी जगायचे का???????
बाबांच्या मनाची तळमळ लक्षात घेऊन माता भिमाई बाबांना म्हणतात की,,"भिमा" नेमका तु कोणासाठी जगशीलं??????
"जन्मदात्या आईसाठी की पालनकर्त्या पित्यासाठी"
"ममतेचा हात फिरवणार्या बहिणीसाठी की नेहमी मानसिक आधार देणार्या भावासाठी"
"प्रेमाच्या वेलीसाठी की त्या वेलींमधून बहरलेल्या फुल्यांसाठी"
"नेमकं कुणासाठी??????
"अरे भिमा,,,हे संपूर्ण जग स्वार्थासाठी"
"आपण जगावं आपल्या माणसांसाठी"

मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण आयुष्य आपल्या माणसांसाठी जगले..........

या संपूर्ण समाजाला विशिष्ट दिशा देऊन त्यांच्या निरागस आयुष्याला सद् धम्माची जोड देऊन त्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्याचे सार्थक कार्य बाबांनी केले....
या संपूर्ण समाजाला बुद्ध धम्माची दिक्षा देण्या अगोदर बाबांनी जगातील सर्व धर्मांचा सतत 21 वर्ष सखोल अभ्यास करुन शेवटी 14आँक्टोंबर 1956 ला नागपूर येथे बुद्ध धम्माचा परिपक्व विचारांनी स्वीकार केला....

परंतू बुद्ध धम्माचा स्वीकार करण्या अगोदर बाबांनी पहीला ग्रंथ वाचला,,,त्याचे नाव होते "बायबल"
बायबलामध्ये येशू ख्रीस्त सांगतात की मी कोण आहे??????

मी देवाचा पुत्र आहे,,,पहिला आणि शेवटचा,,,
येशूंचे स्वत: बद्दलचे उत्तर ऐकून बाबासाहेब विचार करतात की,,,येशु सुद्धा मला कुठे नेतोय????? परमेश्वराकडेचं नेतोय...

बाबासाहेब दुसरा ग्रंथ वाचतात,,त्याचे नाव होते "कुराण"

या कुराणाच्या आयातामध्ये हजरत अली मोहम्मद पैगंबर म्हणतात की,,मी कोण आहे????????

तर मी अल्लाचा प्रेषित आहे
पहिला आणि शेवटचा.....

बाबासाहेब तिसरा ग्रंथ वाचतात,,,त्याचे नाव होते "भगवदगीता"
या भगवदगीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की,,,मी कोण आहे??????
तर मी देवाचा देव आहे.......मी मोक्षदाता आहे,,,,

बाबासाहेब श्रीलंकेमध्ये असतांना तथागतांचे त्रीपठीके वाचतात,,,त्या त्रिपठीकांमध्ये तथागत स्वत:ची सुंदर अशी ओळख करुन देतात,,,,

"तथागत" म्हणतात की,,,मी कोण आहे?????
🌹"मी एका स्त्री आणि पुरुषांपासून जन्माला आलेलं एक बाळ आहे.......मी केवळ मार्गदाता आहे"🌹

मित्रांनो एक स्त्री आणि पुरुष ही दोघे जर का एकत्र आलीचं नाही,,,तर या संततीची निर्मिती होऊ शकते का?????????

नाही होऊ शकत..
हा सत्यावर आधारित असलेला परिसा समान सुंदर असा बुद्ध धम्म बाबांनी आम्ही दिला..
बुद्ध धम्म तर दिलाचं
पण त्याच बरोबर त्रिशरण आणि पंचशील सुद्धा दिले.
हे पंचशील असे आहे मित्रांनो,,,,जर भारताने बुद्ध धम्माचा नव्याने स्वीकार करुन आपल्या दररोजच्या नित्य दिनक्रमात पंचशील अनुकरणात आणले,,,,तर या देशातील संपूर्ण समस्या क्षणार्धात नाश पावेल........

येथील ब्राम्हणांनी,,हिंदूंनी,,कुणबी,,पाटील,,देशमुख,,मराठा,,माळी बुद्धिष्ट समुदायाने आपल्या घराच्या तथागतांची मुर्ति बसवून,,,दररोज त्या मुर्तीपुढे नतमस्तक होऊन पंचशील धारण करायला हवे...
"अन्ना हजारे" खूप दिवसांपासून ओरडून सांगत आहे की या देशातील भ्रष्टाचार मिटला पाहीजे,,,
पण देशातील भ्रष्टाचार कसा मिटला पाहीजे,,हे मात्र अन्ना हजारे सांगत नाही.....

परंतू तथागतांना पंचविशसे(2500) वर्षांपुर्वी सांगितले की भ्रष्टाचार कसा मिटवायला हवा ...........
त्यासाठी तथागतांनी एक पंचशील दिले आहे,,,
"मुसावादा वेरमणी सिख्खा पदम समादी यामी"
"मी खोट बोलणार नाही,,अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो....
तुम्ही खोटचं बोलू नका,,भ्रष्टाचार वाढणार नाही......

देशात दररोज स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहे,,,
त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण केले जातात,,
त्याच्यावर बलात्कार केले जातात...!
हे सर्व अनिष्ट आणि माणूसकीला काळीमा फासणारे प्रकार आपण एका दिवसात खांबवू शकतो..

"कामेसुमेच्चचारा वेरमणी सिख्खा पदम समादी यामी"
मी कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो.

जर देशातील प्रत्येक मनुष्याने दररोज हे
पंचशील ग्रहण केले तर देशातील एकाही मुलीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार होणार नाही...
ऐवढे सामर्थ्य या पंचशीलांमध्ये आहे,,,पण हे तेव्हाच शक्य आहे,,जेव्हा संपूर्ण भारत या पंचशीलेचे वास्तविकरित्या अनुकरण करेल....

परंतू येथे बाबासाहेबांची फसगत झाली,,,संपूर्ण मानवी समाज बाबासाहेबांच्या विचारांना बेईमान झाला...कारण बाबासाहेबांना जो समाज अभिप्रेत होता,,,तो समाज म्हणजे काय?????
"what means by society?????

बाबासाहेबांना जो समाज अभिप्रेत होता तो समाज पुढीलप्रमाणे आहे.
"स" म्हणजे सदगुणी
"मा" म्हणजे माणूसकीला
"ज" म्हणजे जपणारा.........

असा असतो समाज.
हा समाज बाबासाहेबांना अभिप्रेत होता. पण असं म्हणतात की,,बुद्ध धम्म हा परिवर्तनशील धम्म आहे...
म्हणून समाजाच्या व्याख्ये मध्ये सुद्धा परिवर्तन झाले. आणि आताच्या आधुनिक काळात समाजाला परिपक्व सुट होणारी व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.

"स" म्हणजे सडलेला
"मा" म्हणजे मागासलेला
"ज" म्हणजे जंग चढलेला

असा आहे आपला समाज.....

ज्या भारता बद्दल आम्हांला ऐवढा अभिमान वाटतो,,,,
तो भारत म्हणजे काय?????
"what means by india?????

भारताची खरी ओळख पुढीलप्रमाणे आहे.....
"भा" म्हणजे भाकरीसाठी
"र" म्हणजे रयत(शिवाजी महाराजांच्या काळात जनतेला रयत म्हणत असे आणि
"त" म्हणजे तरसणारा.....

मित्रांनो असा आहे आपला खरा भारत.
माझा भारत महान म्हणण्यापेक्षा
माझा भारत महाग म्हटलेले बरे........

मित्रांनो बाबासाहेब बोलायचे की,,,
"जन्माला येणं माझ्या हातात नव्हतं,,म्हणून मी जन्माला आलो" परंतु मरणं माझ्या हातात आह,,,कदापि मी हिंदू म्हणून मरणार नाही"
ही सिंहाची गर्जना फोडणारे परमपुज्य  डाँ.बाबासाहेब आंबेडकर होते. परंतू आपल्या लोकांवर हिंदू धर्माचा जबरदस्त पगडा आहे. ते आज हिंदू धर्मांचे सण साजरे करतात,,मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेला बळी पडतात.

हिंदू समाज सत्यनारायणाची पुजा करतात आणि आपला समाज त्यांच्यांच प्रमाणे परित्राणपाठ करतात.
"मित्रांनो तथागतांनी अख्ख्या आयुष्यात कधी परित्राणपाठ केले नाही,,पण आपला समाज मात्र परित्राणपाठ करायला सुरुवात केली.

हिंदू धर्मातील जनता हाताला भगवा किंवा लाल धागा हाताला बांधतात आणि बुद्धिष्ट समुदाय हाताला पंचशीलेचा पांधरा धागा बांधतात.
पंचशीलेचा धागा हाताला बांधतांना हा पण विचार करत नाही की,,पुढचा व्यक्ति खरच पंचशीलानुसार आचरण करतो की पंचशीलाच्या विरुद्ध करतो,,याचा मात्र विसर पडतो...

म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे भाग्य जर का आकाशातील ग्रह आणि तारे ठरवित असतील,,,तर माझ्या या बुद्धिचा आणि मनगटाचा काय फायदा?????
बाबांनी स्वतच्या बुद्धिचा आणि मनगटाचा वापर करुन जगात वैचारिक क्रांती घडवून आणली. परंतू आपला समाज मात्र त्याच अंधश्रद्धेच्या पगड्यामध्ये गुरफटतांना दिसतोय..

आपल्या प्रबळ शत्रू पेक्षाही
आपले तथ्यहीन विचार
आपल्यासाठी आणि समाजासाठी
अपायकारक व हानिकारक ठरतात.

आज हा धम्माचा गाढा पुढे नेण्यासाठी आम्हांला तो अगोदर पूर्णपणे समजावून घ्यावा लागेल..
कारण कुठल्याही गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी त्या सारखे सामर्थ्य या मनात निर्माण करावे लागतात...तेव्हा त्या गोष्टीची जाणीव या मनाला होणार........!

परंतू हे कार्य आम्हांला इतरांवर अवलंबून न राहता,,स्वतच पुढाकार घेऊन करावे लागणार,,कारण
"इतरांच्या सावलीत उभे राहून आपण आपल्या सावलीचे
स्वतंत्र अस्तित्व गमावतो
परंतु प्रत्येकाला आपल्या
सावलीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी
एकदातरी त्या कडकडत्या सूर्याच्या प्रखर उष्णतेत
स्वतंत्र उभे रहावेच लागते.....

म्हणून आम्हांला आता नविन सुरुवात करावी लागेल,,,नवनविन माणसांना या कार्यात सहभागी करावे लागेल.....
"जे एका दिवसाचा विचार करतात
ते लोकांसोबत बोललात
जे एका वर्षाचा विचार करतात
ते रोपटं लावतात
जे दहा वर्षांचा विचार करतात
ती झाडी लावतात
जी संपूर्ण आयुष्याचा विचार करतात  ती माणसे जोडतात
आणि जी माणसे जोडतात
ती बहुतांश व्यक्ति आयुष्यात यशस्वी होतात......

आम्हांला खरा बुद्ध धम्म संपूर्ण भारतात रुजवायचा आहे..
"दिव्याला दिवा लावत गेला की
दिव्यांची एक दीपमाळ तयार होते
फुलाला फुल जोडत गेलं की
फुलांचा एक फुलहार तयार होतो
हाराला हार जोडत गेलं की
हारांची एक माळ तयार होते
आणि जर का
माणसाला माणूस जोडतं गेलं की
माणूसकीचं एक सुंदर नातं तयार होतं"

आमचा धम्म आम्हांला हाक मारत आहे,,तो आम्हांला म्हणत आहे की,,
"मी एका पडीत जमिनीप्रमाणे
तुम्हां सर्वांच्या सुखद आधाराची आतुरतेने वाट बघत आहे.
जर का माझ्यावर एकदा
तुम्हां सर्वांच्या आधाराचा सुखद पाऊस पडला तर,,, मी पुन्हा हिरवागार होणार आणि बहरायला सुरुवात करेल.
म्हणून तुमच्या आधाराच्या सुखद पावसाला माझ्या वर लवकरात लवकर सुखद वर्षाव करायला सांगा,,,कारण मला तुमच्याच केवळ तुमच्याच आधाराची गरज आहे....

धम्माशी एकनिष्ठ होऊन संपूर्ण भारत सत्य बुद्ध धम्माचे बुद्धमय करुया..
पण हे वाटते तेवढे सोपे काम नाही
धम्माचे कार्य करत असतांना आपणा सर्वांना भरपूर संकटांचा सामना करावा लागेल,,,,
परंतू पुढील प्रेरणादायी ओळी मी आपणा सर्वांसाठी लिहत आहे.

"आयुष्य हे नेहमीच सुखाने भरलेले नसतात
थोडे दु:खही असतात
पण आयुष्याच्या रात्रीनंतर
सकाळ मात्र सोनेरी किरणांनी सजून येते
जर आयुष्यात अशी कधी कठीन वेळ आलीच कि
जेव्हा आपलं म्हणून काळजी घेणारं कोणीचं नसेल
तेव्हा अगदी मनापासून हाक मारा
आपला बुद्ध धम्म आणि त्याची वैचारिक विचारधारा तिथेचं असेल"

आम्ही जर का धम्माच्या कार्याची सुरुवात केली,,तर आपण नक्कीच परिवर्तन घडवून आणनारचं,,,,कारण आपण या जगाचा इतिहास लिहिणार्या बाबांची मुलं आहोत,,

"सूर्याची गर्जना आमची
आम्ही वाघाची रं पिलं
चिरत नेऊ अंधार सारा
आम्ही क्रांतीसूर्याची लेकरं "

मित्रांनो मला आज आपल्याशी  थोडं बोलायचं होतं म्हणून या लेखाद्वारे मी स्वतचे विचार आपणा सर्वांपुढे मांडलेत.
मित्रांनो जर आपल्याला धम्माच्या कार्याची आवड असेल तर कृपया मला पुढील क्रमांकावर काँल करा.
कारण 2020 पर्यंत आपल्याला अर्ध्या पेक्षा जास्त महाराष्ट्र बौद्धमय करायचा आहे,,हे सकारात्मक उद्धिष्ट डोळ्यापुढे ठेऊनचं धम्माचे कार्य करण्याचा संकल्प केलेला आहे.
परिपक्व विचारांनी एकत्र येऊन बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करुया.......
वैचारिक क्रांतीच्या बुद्धिजीवी विचारांचा सर्वांना क्रांतिकारी जय भिम

🌹"मंगेश नाईक" 🌹
🌺"महाराष्ट्र राज्य प्रवक्ते"🌺
🌷"आक्रमण युवक संघटना"🌷

Tuesday, October 18, 2016

नाशिक मध्ये बौद्ध समाजावऱ झालेल्या सामूहिक हल्ल्यात पीड़ित असलेल्या बऱ्याच पीडित कुटुंब

 नाशिक मध्ये बौद्ध समाजावऱ झालेल्या सामूहिक हल्ल्यात पीड़ित असलेल्या बऱ्याच पीडित कुटुंब, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिस Atrocities victims शी आज adv गुणरतन सदावरते सर, डॉ. जयश्री पाटिल, सम्राट चे मुम्बई रिपोर्टर पाइकराव आणि मी सागर झेंडे यांनी भेट घेऊन सर्व झालेला अन्याय समजावून घेतला व सर्व सत्य परस्थिती समजावून घेतली आणि facts collect करण्यात आले. परिस्थिति भीषण आहे. पुढील case follow up साठी directions निश्चित झाले...

Brief points-

1) Atrocities च्या 500 (approx) च्या जवळपास cases होतील.

2) काहि बौद्ध तरुण अजुन ही missing आहेत..

3) 4 व्हीलर cars, 40-50 bikes, tractors, घरे असे प्रोपेर्टी damage करोडांच्या वर झालेले आहे..

4) पोलिसांची भूमिका ही तरुण बौद्ध तरुणांना खोट्या गुन्हयात  गोवण्याचे आहे.. शिक्षित तरुण यांच्यावर मोठ्या प्रमाणात cases दाखल केल्या आहेत..आई वडील न्यायासाठी वण वण करत आहे.. (सर्वांना सोडवण्याचा मार्ग उपलब्ध आहे, काम सुरु झाले आहे या दिशेने, काहि दिवस जातील..)

5) भीम नगर area त वस्तीत जाउन घरात घुसून बौद्ध महिलांना ही मार हांन झाली आहे.. मराठा समाजाने 4 दिवस अमानुष अत्याचार केला, रस्ते आडवले, जाळपोळ केली तरीही त्यांच्या गावात/ वस्तीत त्यांच्या महिलांना मारहाण पोलिस करत नाही..असे का घडते याचा विचार करायला हवा.. आणि अजुन किती पिढ़या आपन हेच सहन करनार आहोत? हे थांबू शकेल पण समूह तयार व्हायला हवा..परिस्थिति बदलू शकते..

6) हल्लेखोर हे सर्व एकजातिय मराठा जातीचे आहेत, व सर्व सूत्रधार हे Shivsena, Congress, NCP, BJP, MNS या पक्षाचे मराठा जातीचे नेते आहेत..(बौद्ध समाजाने पुन्हा या पक्षाना मत द्यावे का ? विचार करावा..जर हल्ले होउन ही यांन मत आपन दिले तर आपला अंत निश्चित आहे)

7) पवन पवार यांच्या सारख्या नगरसेवक असताना पोलिसांनी घरावर हल्ला करुण मार हान केलि आहे घरातील महिलांना ही..( यांनी 2 महीन्या पूर्वी BJP त प्रवेश करत पोट निवडणुकीत 2 नगरसेवक शिवसेने विरोधात निवडून आनले BJP नी बौद्ध पवार यांच्या militancy चा वापर केला आहे आणि आज पोलिसानी यांच्या कुटुंबावर हल्ला केलाय BJP कडे गृह मंत्रालय असून पवारानि ताकत वाढवूनBJP मदतीला येत नाहि..यातुन जातीयवादी पक्षातील बौद्ध लोकांनी गंभीर विचार करावा..) (अजुन बरेच काहि..)

8) नाशिक मधिल हल्ला हा बौद्ध अस्मितेवर हल्ला आहे..बुद्ध विहार, आपली श्रद्धा स्थाने यांच्या वर हल्ला आहे..याचे गांभीर्य ओळखून बौद्ध समाजाने आपली शक्ति unite consolidate करायला हवी.आपले सरक्षण आपन करायला सरसवाले पाहिजे.हया असल्या पोकळ आणि अत्याचारी दहशतीला जराही न घाबरता स्व सरक्षना साठी चळवळ करावी.. आणि सर्वांना दाखवून द्यावे की कोणी कितीही दडपन्याचा प्रयत्न केला तरीही बौद्ध समाज दबणार नाहीं तर अजुन ताकदीने संघटित होऊन बाबासाहेबांच्या vision मधील Constitutional and Democratic भारत निर्माण करेल.. अशी आशा नाशिक मधिल पीड़ित लोकांना भेटून वाटते, अजुन ही नाशिक मधिल बांधवांची आणि भगिनींची लढण्याची उमेद जशी च्या तशि आहे कोणत्याही  हल्ल्यामुळे  त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला नाहि..हे पाहून अजुन बळ प्राप्त झाले संघर्षांसाठी प्रेरणा मिळाली बळ मिळाले..

9) समूह म्हणजे शक्ति आहे ती लवकरात लवकर विधायकतेने निर्माण करण्यासाठी सर्व समाजाने यंत्रणा निर्माण करायला पुढे यावे.. नमो बुद्धाय,जय भीम!!!

सागर झेंडे ( Permanent Representative of United Nations

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Popular Posts