Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Saturday, January 2, 2016

अयोध्या : बुद्धकालीन साकेत



अयोध्या : बुद्धकालीन साकेत


रामायणात रामाचे राज्य हे अयोध्येत होते असे सांगितले जाते त्याचा एक भाग म्हणून अयोध्या आहे हि सरयू नदीच्या काठावर आहे असे सांगितले जाते पण याच अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आले होते आता हि अयोध्या नेमकी काय कशी झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत इ सन पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने  रघुवंश नावाचे महाकाव्य लिहिले पण हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असे उल्लेख करतो त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान त्यावेळी बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ?  यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या 

बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागाला होता ती जनपदे अशी होती  काशी कोसल अंग मगध वज्जि मल्ल चेदी वत्स क्रुरु पंचाल मत्स्य सुरसेन अस्सक अवंती गंधार आणि कम्भोज  यामध्ये अनेक शहरे आणि निगम  व गावे  होती परंतु महानगरे फक्त सहा होती ती अशी चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोशांबी आणि वाराणशी  अशी महानगरे होती याकाळात बुद्धाचे महापरी निर्वाण झाले तेव्हा आनंद याने तथागत यांना या महानगर मध्ये जाण्याची विनंती देखील केली होती {दिघनिकाय  १६. ५. १७. } 

आता साकेत कडे जाण्याचा मार्ग सुद्धा पाहूया 

तथागत बुद्धाने आपल्या धम्माचा प्रचार करीत सतत ४५ वर्षे चारिका करीत  भ्रमण करीत राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले आहेत त्याच्या नोंदी त्रिपिटक मध्ये सापडतात  त्यात साकेत च्या हि नोंदी सापडतात त्याची माहिती घेवू या कोसल वासीय ब्राह्मण बावरी साधना करीत थेट दक्षिण पथामधील गोदावरी नदीच्या तीरावर अस्सक नावाच्या स्थानाजवळ आश्रम करून राहत होता त्याने ऐकले होते कि गौतम गृहत्याग करून श्रमण होवून सम्यक बुद्ध झाला आहे  त्याने  बुद्धांची भेट घेण्यासाठी आपले सोळा  शिष्य ज्या मार्गाने गेले त्यातील प्रमुख शहरांची  नावे आहेत प्रतिष्ठान  महिष्मती उज्जैन गोनद्ध  वेदिसं वनसह्य कोसंबी साकेत आणि श्रावस्ती  म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्या मार्गावर साकेत लागत होते आणि नंतर श्रावस्ती वरील माहिती व मार्गाच्या नोंदी सुत्तानितापातातील पारायणवग्ग मधील वत्थुगाथेत { ३६. ३७. ३८. } उपलब्ध आहेत येथे साकेत च्या सबंधित नोंदींचा विचार करणे आवश्यक आहे

आता या साकेत आणि श्रावस्ती मधील मार्ग नेमका कसा आहे हे देखील पाहू या
यामध्ये आपल्याला विनय पिठक मध्ये श्रावस्ती आणि साकेत यांचा मार्ग सांगितला आहे कारण भिक्षु साकेत वरूनच श्रावस्ती ला जायचे आनंद यांच्याकडे असणारे अतिरिक्त चीवर सारीपुत्त यांना देण्यासाठी साकेत मध्ये गेले होते   तसेच पाथेय्यक भिख्खू बुद्धाबरोबर वर्षावास घालवावा म्हणून श्रावस्ती ला जाण्यास निघाले परंतु वेळेवर न पोहचल्याने ते साकेत मधेच राहिले कारण वर्षाकालात भिक्षु ला प्रवास करण्यास मनाई होती हा संघाचा नियम होता तेव्हा ते असे हि म्हणाले कि तथागत आमच्यापासून सहा योजन दूर आहेत  परंतु आम्हाला तथागत यांचे दर्शन घेता येत नाही  या विचाराने ते खिन्न झाले होते महावग्ग मध्ये अश्या नोंदी सापडतात
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साकेत शहर हे सरयू नदीच्या तीरावर वसलेले होते कारण याच तीरावर अंजन वनात भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य थांबले होते आता रामायणात अयोध्या हि सरयू नदीच्या पात्रापासून दीड योजन म्हणजे १५ मैल अंतरावर आहे पण हि सरयू नदी ऋग्वेदात मात्र सिंधू नदीच्या पश्चिमेला असून ती पश्चिमेला तोंड करून वाहते असे सांगितले आहे तर उत्तर प्रदेशातील सरयू नदी हि उत्तरेकडून खाली वाहत गंगेला मिळते यावरून साकेत हीच अयोध्या आहे   आता हिचे नाव अयोध्या कसे  पडले याचा हि इतिहास  पाहणे आवश्यक आहे थोडे याकडे हि पाहू या पण त्याआधी ब्राह्मणी साहित्यात देखील नकळत सत्य लिहिले गेले   त्याचे उदाहरण म्हणजे पातंजली  याने पाणिनीच्या  व्याकरणावर भाष्य करण्यासाठी महाभाष्य नावाचा ग्रंथ इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात लिहिला होता त्यात त्याने यदनराज मिनडर याने माध्यमिक आणि साकेत वर ताबा मिळवल्याचा उल्लेख महाभाष्य पातंजली याने केला आहे शिवाय  वायू पुराणात हि साकेत चा उल्लेख आहे पुराणामध्ये अनेक ठिकाणी साकेत चा उल्लेख पाहायला मिळतो शिवाय एक महत्वाचे उदाहरण म्हणजे मथुरेला जशी कृष्ण ची द्वारका सांगण्याचा प्रयत्न केला पण उत्खनन करतात  तेव्हा बुद्धाचे अवशेष सापडले आणि त्याचा महत्वाचा भाग असा कि चैत्यन्य याने कृष्णाचा खूप प्रचार केला आणि त्याने आपला शिष्य लोकनाथ आचार्य यास कृशांच्या लीलांनी प्रवित्र स्थळे शोधून काढण्यास सांगितले शिवाय चैत्यन्य स्वतः मथुरेला वृंदावनात १५१६ ला गेला त्याने अनेक स्थळे शोधली त्यात त्याने राधाकुंड हे नव्याने शोधून काढले  होते असे हि सांगितले जाते कि चैत्यन्य आणि त्यांची शिष्य रूपा  आणि सनातन यांनी पूर्वी विस्मृतीस  गेलेली कृष्णालीलांची स्थळे शोधून काढली आणि मग त्यावर वैष्णव भक्तांनीपंधराव्य आणि सोळाव्या शतकावर मंदिरे बांधली पण वास्तविक  हि सर्व मंदिरे  बौद्ध विहार आणि स्तूप यांच्या अवशेष यांच्यावर  बांधली गेली आणि अश्याच पद्धतीचे काम हे रामाच्या भक्ताकडून झाले आहे रामालीलांच्या जागी जवळपास ३६० मंदिरे बांधली गेली आणि हे काम राजा विक्रमादित्य याने केल्याचे सांगितले जाते
आता हा विक्रमादित्य नाचे पात्र नेमके कोण कारण गुप्त घराण्यात स्कंध गुप्त हे नाव आहे तर हा राजा स्वतः ला रामाशी तुलना करून घेत असे आणि याला या लोकांनी विक्रमादित्य म्हणून म्हटले आहे पण हे सारे थोतांड कसे आहे हे सांगताना आपल्याला स्कंध गुप्त याच्या दोन पिढ्या अगोदर जावून पहिले यत्र कालिदास याने साकेत आणि आयोध्य हि एकच नावे आहेत असे सांगितले आहे  आता हे हि सांगितले जाते कि चंद्रगुप्त दुसरा हा पाटील पुत्र शी सबंधित शेवटचा राजा होता  शिवाय खरे पाहता या  राजाने  साकेत वर  चाल केली नव्हती आता या पाटील पुत्रावर गुप्तांची राजवट हि इ सन ३२० मध्ये झाली तेव्हा हि साकेत हे साकेतच या नावाने होते तेथे रामाने राज्य केल्याचा कोणतीही माहिती नाही आणि जे सांगितले जाते कि विक्रमादित्य याने साकेत वर चाल करून मग रामाची अयोध्येच शोधकार्य केले हा दावा फोल ठरतो कारण साकेत वर गुप्त राजवटीने कधी हि चाल केलेली नाही याचे प्रमुख कारण आहे अशोकाचे आणि साकेत  शहरातील झालेल्या तहाचे आहे कारण अशोकाने साकेत वर हल्ला करण्याचा बेत आखल्यावर शाकेत वासियांनी अशोकाशी करार केला होता कि अशोकाच्या साम्राज्यात साकेत येईल पण साकेत चा कारभार हा साकेत वासियांकडे राहील म्हणून अशोकाने साकेत शी कधी हि युद्ध न करण्याचा निर्णय त्यांना दिला होता तेव्हा त्या निर्णयाला अयुद्ध   म्हणून संबोधले जाते  आणि मगध साम्राज्यात कोसल साम्राज्य देखील विलीन झाले होते अशोकाच्या काळी नंतर अशोकाची राजधानी राजगृह होती आणि राजगृह कडे जाण्याचा मार्ग साकेत मधून निघत  होता आता गुप्त जेव्हा सत्तेत आले तेव्हा  त्यांनी साकेत वर कधीहि चाल केली नाही  मग विक्रमादित्य साकेत वर चाल करून रामाची अयोध्या शोधतो हा दावा खोटा साबित होतो  शिवाय फाहीयान देखील साकेत ला इ सन ४०२ ते ४०३ च्या सुमारास आलेला आहे त्याने देखील साकेत चा उल्लेख केला आहे ते म्हणजे साकेत शहराच्या दक्षिण द्वाराने बाहेर पडल्यास एक वृक्ष आहे तिथे बुद्ध अनेकवेळा बसले होते आणि त्या ठिकाणी बांधलेला स्तूप आज हि चागल्या स्थितीत आहेत आता फाहीयान देखील साकेत चा उल्लेख साकेत म्हणूनच करतो म्हणजे इ सन ४०३ पर्यंत साकेत चे नाव आहे तेच आहे

आता भारतात पुरातत्व विभागाची निर्मिती हि इंग्रजांच्या काळात झाली कारण जेव्हा इंग्रज  सरकारी कामासाठी गावोगावी जात तेव्हा त्यांना भग्न अवस्थेत पडलेल्या मुर्त्या अवशेष दिसत काही ठिकाणी त्यांना शिलालेख हि सापडत  आणि तेव्हा त्यांनी ते सर्व एका ठिकाणी जतन करून ठेवण्याची संकल्पना केली  त्यातील एका अधिकारी असणारे विलियम जोन्स यांनी १७८४ साली पुरातत्व विभागाची स्थापना केली व भारतातील प्रमुख ग्रंथांच्या सहाय्याने ते शोध घेवू लागले आणि हे काम ५० वर्षे चालू होते १८३४  पर्यंत हे काम  चालू होते प्रथम त्यांनी रामायण महाभारत या ग्रंथांच्या बाबतीत शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामायणातील रामाचा वनप्रवास अयोध्येपासून लंके पर्यंत चा प्रवास कसा असेल याचा शोध घेताना अनेक पुरावे मिळाले परंतु सारे हे बौद्ध अवशेष मिळत गेल्याने इंग्रजांचा शोध घेण्याचा दृष्टीकोन बदलला मग त्यांनी जगभरातील बौद्ध साहित्याचा अभ्यास करून बुद्धाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मग भारतात बुद्धाच्या  इतिहासाचे उत्खनन होवू लागले त्यात  कनिंगहम  याने बनारस जवळील सारनाथ येथील स्तुपाचा शोध लावला १८४५ साली  फर्ग्युसन यांनी पश्चिम  भारतात कान्हेरी लेण्याचा शोध  लावला  आणि त्यांनी ट्री  अन्ड सरपटं व्हरशिप हा ग्रंथ लिहून त्यांनी सांची आणि दक्षिण अमरावती  येथील स्तुपांची माहिती प्रसिद्ध केली  आणि महत्वाचे म्हणजे पुरातन अवशेष यांची माहिती चोहीकडून माहिती येत होती  सरकार ने पेशाने इंजिनिअर असलेल्या  अलेक्झडर  कनिंगहम याची नेमणूक आर्कियालॉजी  सर्व्हेअर ऑफ इंडिया या नव्या पदावर नेमणूक केली त्यांनी नोव्हेंबर १८६१ पासून काम हाती घेतले  नंतर त्यांची मेजर जनरल या पदावर बढती करण्यात आलो या काळात सर ठिकाणी उत्खनन करताना कनिंघम यांनी ह्युनत्संग  आणि फाहीयान यांनी जी माहिती उजेडात आणली होती तिचा आधार घेत  उत्खनन सुरु केले गेले  आणि बुद्धाचा इतिहास पुढे आणला गेला  
आणिविशेष भाग असा कि बुद्धाच्या हयातीत च बुद्धाच्या शरीराची जतन केले जात असत  केश असोत वा नखे यांची स्थापना केली जायची त्यांचे स्तूप बांधले जायचे आणि अश्याच नखे आणि केश असणारा स्तुपांचा उल्लेख हा साकेत मध्ये येतो तेव्हा स्तूप हे मातीचे ढिगारे असायचे नुसते आणि आत मध्ये बुद्धाच्या शरीर धातू असत हि सुरुवातीची रचना असे पुढे अशोकाने धम्माच्या मार्गाने चालल्यावर त्या स्तुपांवर दगड विटांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली  आणि साकेत इथे अश्याच स्तुपांचा उल्लेख ह्यूनत्सांग याने केले आहे 
आता महाभारत आणि रामायण या काव्याना सत्य साबित करण्याच्या नादात हे लोक बुद्धाला जमिनीतून बाहेर काढण्याच्या मार्गावर आले रामायण महाभारत सिद्ध करण्यासाठी १९४७ ते २००३ पर्यंत खूप प्रयत्न केले पण  हवे ते सत्य सापडू शकले नाही आणि गंमत अशी कि स्वतः जातीने ब्राह्मण असणारे एम सी जोशी पुरातत्व विभागाचे तज्ञ स्वतः सांगतात त्यांच्या archaeology  and  indian  tradition  puratatva   याचे अनेक भाग आहेत त्यात त्यांनी खूप  विश्लेषण केले आहे
आता अयोध्येमधील पुरातन स्थान पाहू या त्यात मणी पर्वत या नावाने ओळखला जाणारे एक स्थान आहे हि निसर्गनिर्मित टेकडी नाही हि मानवनिर्मित टेकडी आहे शिवाय हि विटांचे तुकडे आणि खडीच्या लाद्यापासून बनवलेली आहे तिची उंची ६५ फुट आहे जुन्या विटा ११ इंचाच्या असून जाडी ३ इंचची आहे  जमिनीपासून ४६ फुट वरच्या बाजूला पश्चिमेकडे खडीच्या लाद्यांची अर्धगोलाकार भिंत आहे तिथे ४० फुट जाडीचे ढीग होते ते पूर्वी त्याच्यावर असलेल्या उंच इमारती पेक्षा कमी जाडीचे होते परंतु ब्राह्मण लोकांनी सांगितले कि रामाला मदत करण्यासाठी सुग्रीवाने चुकून तो पर्वत खाली पाडला  आणि  तो हा मनी पर्वत
पर्वत खाली पाडला तरी तो नैसर्गिक असतो मानवनिर्मित होणार नाही  या मणी पर्वताचे उत्खनन केले असते तर खरा इतिहास पुढे आला असता पण याचे अद्याप उत्खनन करू दिले नाही  कारण याचे बांधकाम यावरून यांना देखील संशय आहे कि इथे बुद्धाच्या शरीर धातूवर बांधलेला स्तूप असावा म्हणून
कुबेर पर्वत  : हा मणी पर्वताच्या ५०० फुट दक्षिणेला कुबेर पर्वत आहे हा सुद्धा मानवनिर्मित आहे २८ फुट उंचीचा विटांचा तुकड्यांचा असूनइथे कामासाठी विटा नेताना केलेलं खड्डे स्पष्ट दिसतात येथील विटा ११ इंच आणि २ इंच्ज जाडी च्या आहेत इथे एक तलाव देखील आहे त्याला हिंदू लोक गणेश  कुंड  म्हणतात तर मुस्लिम इमाम तलाव म्हणतात 
सुग्रीव पर्वत हा कुंडांच्या जवळ आग्नेय दिशेला  गोलाकार टेकडी आहे यांची उंची साधारण १०  फुटापर्यंत असावी असे सांगितले जाते याचे दोन भाग पडतात एक उत्तरेकडील ३०० चौरस फुटांचा आणि एक दक्षिणेकडील २०० चौरस फुटांचा आणि दोघांच्या मध्ये एक भग्न अवस्थेत एक टेकडी आहे तिथे साडे आठ चौरस मध्ये विटा हाते दक्षिणेकडे एक विहीर आहे
आता इथे मुस्लिम लोकांच्या कबरी देखील आहे  परंतु ह्यून त्सांग याने जे वर्णन केलेले कालकाराम विहार  विहाराचा उल्लेख साकेत मध्ये सांगितला जातो ते विहार आता सुग्रीव पर्वत म्हणून ओळखले जाते कारण त्याचे अवशेष राहिले आहेत शिवाय या विहाराच्या बाजूलाच अशोकाने २०० फुटीचा एक स्तूप बांधला होता  कारण बुद्धाने इथे धम्माचे उपदेश केला होता म्हणून तिथे एक स्तूप बांधला होता तो स्तूप आजला मणी ब पर्वत म्हणून लोक सांगतात  ह्यूनत्सांग याने स्पष्ट उल्लेख केला आहे आज हि त्याचे स्थान हे ६५ फुट उंचीचे आहे आणि मानवनिर्मित आहे आणि विटांचे  बांधकाम हे प्रामुख्याने स्तुपाचेच आहे  आणि विशेष म्हणजे सुरुवातीचे बांधकाम हे मातीचे असून वरील बांधकाम हे दगड विटांचे आहे त्यामुळे हे स्तुपांचे अवशेष आहेत हे नाकारता येत नाही  ह्यून त्सांग ने अजून एक केलाला बुद्धांच्या शरीर धातूंचा स्तूप म्हणजे बुद्धांचे केश आणि नखे यावर बांधलेला स्तूप   शिवाय त्याच्या जवळ असणारे तळे जे आजला कुबेर टिळा म्हणून  किंवा कुबेर पर्वत म्हणून सांगितले जाते आणि तलाव हे कोणी गणेश कुंड तर कोणी इमाम तलाव म्हणतात पण हे बुद्धाच्या केश आणि नखांच्या वर बांधलेल्या स्तुपाजवळ असणारे तळे आहे 
आता कनिंगहम याने सर्व खात्री पटवून सांगितले पण लोकांनी त्यांना उत्खनन करून दिले नाही  आणि अजून एक ब्रिटिश धार्मिक  वस्तूंना संरक्षण देत असत  आणि महत्वाचे म्हणजे कनिंग हम याने त्याच्या रिपोर्ट मध्ये लिहून ठेवले आहे कि इतर पुरातन शहरात दृष्टीस पडतात तसल्या भग्नास्थेत असलेल्या कृत्रिम टेकड्या मिळत नाहीत परंतु इथे त्या विखुरलेल्या विषम आकाराचे विटांचे ढीगदिसतात शिवाय शेजारी असणाऱ्या फैजाबाद गावामध्ये या विटा नेल्याचे  स्पष्ट खुणा इथे दिसतात कारण या गावातील बहुतांश बांधकाम हे साकेत मधून नेलेल्या पुरातन अवशेषामधून  केले गेले आहे  { अ क आरकीयालॉजि रिपोर्ट १९६२ -६३ पान ३२१ }
आता हिंदू धर्माला पुढे नेण्यासाठी बुद्धाच्या एका शिष्य असणाऱ्या हरिती देवी हिला  पुढे आणले कारण एक  लेणी आणि स्तुपामध्ये या हरीतदेवी ची मुर्त्या कोरलेल्या आहेत काही मुलांना पायाखाली घेतलेल्या आहेत तर काही कडेवर घेतलेल्या आहेत याची घटना अशी आहे कि हि देवी  लहान मुलांचे जीव घेत असे त्यांना मारत असे हिंसा करीत असे तेव्हा बुद्धांनी तिच्याच मुलाला लपवून ठेवण्यास सांगितले आणि मग बुद्धांनी तिला लहान मुलाचे  त्यांच्या मात्यापित्यास काय दुःख होते  ते सांगितले यावर पश्चाताप  होवून तिने धम्माची प्रवज्जा घेतली  बुद्धांची शिष्या झाली तिची अनेक रूपे कोरण्यात आली 
आणि महत्वाची नोंद घेताना सांगावे लागते कि बाबरी मस्जिदच्या खाली  त्रिरत्न चिन्ह चित्रित केलेली मातीच्या भांद्य्नाची कापरे मिळाली त्याच बरोबर अशोककालीन ब्राह्मी लिपी अंकित काही मुद्रा देखील मिळाल्या आहेत आणि हे भा वि कुलकर्णी यांनी एक खंत व्यक्त केली होती दिनांक ११ ऑगस्ट २००४ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये मांडली होती कि राजकारणासाठी पुरातत्व विभागाचा वापर झाला म्हणून   त्यांनी असे हि म्हटले आहे कि पाच महिने उत्खनन केले कडेकोट बंदोबस्त मध्ये केले आणि हे उत्खनन ऐतिहासिक निवाड्याला मदत  करणारे आहे बाबरी मस्जिद च्या खाली ज्या संस्कृतीचे अवशेष सापडले हे शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि अहवालात मंदिर असा शब्द हि न लिहिता अहवाल त्यांनी न्यायमूर्ती  यांच्याकडे सोपवला अयोध्येतल्या त्या विशिष्ट टेकडीचा ६० हेक्टरचा भाग रामटेक मध्ये मोडतो मनिपर्वत कुबेरपर्वत हा भाग उत्खनन साठी खुला केला तर तिथल्य नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे टेकाड पोखरले तर सारनाथ च्या तोडीचे अशोक कालीन शिल्प सापडेल हे कुठल्याही पुरातत्व शाखेचा विद्यार्थी सांगेल असे खुद्द कुलकर्णी म्हणतात कारण त्यांचे हे वक्तव्य का होते कारण ह्यून त्सांग आणि फाहीयान यांच्या प्रवास वर्णनात त्याचा स्पष्ट उल्लेख आहेत 
ते पुढे हि असे हि म्हणाले आहेत कि आपण जमीन खोडतो ती इतिहास साठी नव्हे तर भिकार राजकारणासाठी 
{ भा वि कुलकर्णी , महाराष्ट्र टाईम्स मधील त्यांचा लेख दिनांक ११ ऑगस्ट २००४ }
आता एकूण हा सारांश पाहिला तर अयोध्येत सत्य शोधायचे असेल तर एकच करावे लागणार ते म्हणजे मनी पर्वत आणि कुबेर पर्वताचे उत्खनन 
थोडक्यात उत्खनन झालेल्या भागात फक्त बुद्ध अवशेष मिळाले त्यामुळे हे स्थान अयोध्येचे नसून साकेत चे आहे 
आता अयोध्या हा  शब्द देखील अयुद्ध  चा अपभ्रंश झालेले शब्द आहेत  त्यामुळे जे राम आणि रहिम च्या नावाने इथे  बोंबलत आहेत त्यांना सांगावे वाटते कि इतके उतावीळ होवू नका सत्य शोधायला गेलात तर तोंडावर  पडाल 







No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts